शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्यात दंगली घडविण्याचे काम सरकार करतंय : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:44 IST

‘कोरेगाव-भीमा’ तर आता नुकतीच झालेली औरंगाबाद येथील दंगल ही पूर्वनियोजित असून, राज्यातील भाजप-सेनेचे सरकारच दंगली घडवून राज्यात अराजकता माजवण्याचे काम करीत आहे,

सायगाव : ‘कोरेगाव-भीमा’ तर आता नुकतीच झालेली औरंगाबाद येथील दंगल ही पूर्वनियोजित असून, राज्यातील भाजप-सेनेचे सरकारच दंगली घडवून राज्यात अराजकता माजवण्याचे काम करीत आहे,’ असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारवर केला.

करहर, ता. जावळी येथे जावळी बँकेचे नूतन अध्यक्षपदी चंद्र्रकांत गावडे-पाटील, उपाध्यक्षपदी प्रकाश मस्कर यांच्या निवडीच्या सत्कार समारंभप्रसंगी व आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंत मानकुमरे, सभापती अरुणा शिर्के, अर्चना रांजणे, राजू ओंबळे, जयदीप शिंदे, हिंदुराव तरडे, सौरभ शिंदे, जावळी बँकेचे माजी अध्यक्ष विक्रम भिलारे, जावळी बँकेचे सर्व संचालक, सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘जनतेला भाजपा-शिवसेना युती सरकारची नौटंकी समजली असून, भाजप-शिवसेनेने केलेल्या पापाचे उत्तर कर्नाटक जनतेने दिले तसेच आगामी काळात महाराष्ट्रातील जनता देखील सरकार मोडीत काढून माथाडी कामगारांना, शेतकऱ्यांना देशोधडीला  लावणाऱ्या या भाजप-सेनेच्या सरकारला घरी बसवेल.

सरकारने राज्यातील सहकार अडचणीत आणला आहे. सरकार जिथं निधीची गरज नाही तिथं स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी निधी टाकत आहे.भाजप सरकारच्या विविध धोरणावर कडाडून टीका केली. राज्य सरकाने प्रत्येक विषयावर कमिट्या करायच्या; पण पुढे बैठकाच लावायच्या नाहीत. केवळ झुलवा झुलवी करायची, हे सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. सरकारने विकासाच्या नावाखाली सुरू असलेली नौटंकी थांबवावी.’

आमदार शिंदे म्हणाले, ‘बँकेच्या कामकाजात कधीही राजकारण येऊ देणार नाही. बँकेचे कर्जदार सामान्य असून, कोणी मोदी, अंबानी नाही म्हणून बँकेला कोणताही धोका नाही.’ आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांची कामे दर्जेदार होत आहेत. ही कामे मंजूर करण्याचे काम आमदार करतात; परंतु काहीजण दिशाभूल करत आहेत. दुसºयांच्या कामाचे आपण कधीच श्रेय घेतत्त नाही.

गेली दहा वर्षे तालुक्यातील जनतेला सर्वतोपरी सहकार्य केले आहे. लोकांच्या विश्वावर मी तर निवडणुकीत उभा आहेच; पण विरोधात कोणीही राहिले तरीही त्याला घरी बसवणार, हे निश्चित.’ यावेळी नूतन अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचा एकत्रित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गावडे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष मस्कर यांनी आभार मानले.मानकुमरेंचा निरोप पोहोचविणार..वसंतराव मानकुमरेंनी या कार्यक्रमात आपल्याला खासदारकीचे तिकीट मिळावे, अशी मागणी केली. तर तोच धागा पकडून आमदार अजित पवार म्हणाले, ‘वसंतराव जरा धीराने घ्यावे, आपली तिकिटाची अपेक्षा आहे, हा आपला निरोप शरद पवारांपर्यंत तसेच प्रदेशाध्यक्षांपर्यंत नक्कीच पोहोचवेन.’ शिवेंद्रसिंहराजेंनी पक्षाने मानकुमरेंना उमेदवारी दिली तर उमेदवारी अर्जावर मीच सूचक राहीन, हेच भाषणात जाहीर करून त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा असल्याचे दाखवून दिले.करहर येथे जावळी बँकेच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे आदी उपस्थित होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSatara areaसातारा परिसर